Friday, April 17, 2020

नामस्मरण म्हणजे मन-बुद्धीला घातलेले स्नान होय!


श्रीराम!
नामस्मरणात विकारांचा जोर कमी होऊ लागल्यावर सद्विचारही सुचू लागतात. मागे ऐकलेली, वाचलेली उपदेशपर वचने आठवतात आणि बौद्धिक विचाराला त्यांचे साहाय्य होते. उच्च जीवनमूल्यांच्या भूमिकेवरून त्या अडचणीकडे मनुष्य पाहतो, असा प्रभावी व हितकर मानसिक पालट एक दोन तासांच्या नामस्मरणाने तात्पुरता तरी होतोच.

"महत्त्वाची पत्रे देखील मी नेमातून उठल्यावर लिहितो" असे गुरुदेव (रानडे) एकदा म्हणाले. त्याचेही रहस्य हेच होय. नामस्मरण म्हणजे मन-बुद्धीला घातलेले स्नान होय!

~ पूज्य काकासाहेब तुळपुळे यांच्या "डोळस नामसाधन अर्थात आत्मानंदाचा शोध" या पुस्तकातून 

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete